Rekha

कवितेच्या विश्वातलं माझं पहिलं पाऊल

आपण आयुष्याला ठरवून सुंदर बनवू शकतो. कोणत्याही परिस्थितीत आपण आयुष्य जगू सुद्धा शकतो _ हे मला आता कळू लागलेलं आहे. त्याचप्रमाणे ते सर्वस्वी केवळ आपल्याच हाती असतं; ह्याची जाणीव आता मला पुरेपूर झालेली आहे. तेव्हा हे सोन्यासारखं जीवन, आता रडत कुढत असंच जावू देण्याची माझी इच्छा नाही. मला त्यात रंग भरायचेत. मला जीवनात ‘आनंद’ निवडायचा […]

कवितेच्या विश्वातलं माझं पहिलं पाऊल Read More »

मराठी शाळा – संस्कृतीचा कणा

मी एक पन्नास वर्षीय स्त्री असून एका छोट्याश्या गावातील मराठी शाळेतून शिक्षण घेतलेले आहे. त्याचा मला खूप अभिमान वाटतो. कारण बालवयात मायबोलीचा उत्तम सराव झालेला असल्याने आज मी एक लेखिका बनू शकले. मी कविता व चारोळ्या लिहू शकते. माझे विविध विषयावरचे लेख माझ्या ”सुगंधा” ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. खरेतर मी आयुष्यभर गृहिणी बनून जगले. मात्र

मराठी शाळा – संस्कृतीचा कणा Read More »

मन एकाग्र करा: ध्येयाचा प्रवास सोपा करा!

मन उत्साही मन उर्जेचा स्त्रोत  त्यास ध्येयाच्या दिशेने वळवा मनास बनवू नका दु:खाचे कारण  त्यास एकाग्र करून आयुष्य घडवा  मनास वयाचं बंधन नसतं. ते सदैव उत्साही व चिरतरूण असतं.मनाची चंचलता आपल्याला मानसिकरीत्या दमवू सुद्धा शकते.कारण मनास हवं असलेलं सर्वकाही आपण आयुष्यात मिळवू शकत नाही.कधीकधी ध्येयाच्या दिशेने प्रवास करत असतांना आपल्याला काही गोष्टी नाईलाजास्तव सोडाव्या लागतात.ज्याला

मन एकाग्र करा: ध्येयाचा प्रवास सोपा करा! Read More »

पाण्यासारखे बनावे

आपण सगळे जाणतो कि ‘पाणी’ हे सर्व जीवसृष्टी साठी जीवनदायी आहे. पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणे देखील अवघड आहे. पाण्याची तहान आणखी कशानेही भागवता येत नाही. त्यामुळे तहानेने व्याकुळ झालेले जीव पाण्याच्या एक-एका थेंबासाठी कासावीस होतात. तेव्हा पाण्याचे महत्व आपल्यापैकी प्रत्येकाने जाणने महत्वाचे आहे. पृथ्वीवरचा बराच मोठा भाग पाण्याने व्यापला असला तरिही ते पाणि वापरण्यायोग्य नाही. म्हणूनच उन्हाळ्यात

पाण्यासारखे बनावे Read More »

फटाक्यांची दहशत

आज आपल्या समाजात कालपरत्वे अनेक गोष्टींचे स्वरूप बदललेले आहे. आधुनिकतेने जणूकाही सर्वतोपरी क्रांतीच आणलेली आहे. सणवार हे खरेतर आपल्या संस्कृतीचे प्रतिक मानले जातात. त्यांना जेवढी पारंपारीकतेची झालर असेल तेवढे ते नात्यांमधला दुवा सुद्धा बनतात. परंतू आजचे जग मात्र अतिशय जलद झालेले आहे. पाच दिवसांचा दिवाळ सण जो आरोग्याचे, धनाचे, पतीपत्नीच्या सहजीवनाचे, गायी म्हशींचे तसेच बहिण

फटाक्यांची दहशत Read More »

मी आणि माझं देवस्वरूप

तू मला ओळखले नसशील. मी मात्र तुला उत्तमरीतीने जाणते. कारण तू केलेल्या बलिदानानेच आज मी घडू शकले. त्यासाठी तुझे जितके आभार मानावे तितके कमी आहेत. आज जेव्हा मी माझ्यात सकारात्मक परिवर्तन अनुभवते. तेव्हा माझा स्वत:वर विश्वासच बसत नाही. सर्वकाही अगदी स्वप्नवत वाटू लागतं. मात्र त्यासाठी तू खूप काही सहन केलेस. तू अत्यंत निरागस अन भोळी

मी आणि माझं देवस्वरूप Read More »

अहंकाराचा विकृत चेहरा

आपल्या आसपासच्या जगातून हल्ली जे काही आपल्या कानावर पडतं किंवा बघायला मिळतं त्यामुळे मन अक्षरशा चर्र होतं. नात्यांनी केलेले मर्यादांचे उल्लंघन ह्यावर विश्वास बसणं कितीही कठीण असलं. तरी वाईट ह्या गोष्टीच वाटतं की हे अगदी सत्य कथन आहे. लहान सहान कारणांवरून आपल्याच जीवलगांची निर्घुण हत्या करणे माणसांना अगदी सोपे वाटू लागले आहे. अशीच एक दुर्दैवी

अहंकाराचा विकृत चेहरा Read More »

तंत्रज्ञान – वेळेची गुंतवणूक नात्यांसाठी

नाती आपल्या आयुष्याची जीवनरेखा असतात. म्हणूनच त्यांच्याकरीता आपण रात्रंदिवस झटत असतो. त्यांना जगातील सर्व सुखसोयी प्रदान करता याव्यात ह्यासाठीच आपली सर्व भागदौड सुरू असते. परंतू नाती जोपासण्यास काय एवढे पुरेसे आहे? तर नाही. कोणतेही नाते उमलते व हळूवार विकसित होते ते फक्त वेळेची व भावनांची गुंतवणूक केल्याने. कारण नात्याला मनाची भाषा कळते. तेव्हा मनं जुळल्याशिवाय

तंत्रज्ञान – वेळेची गुंतवणूक नात्यांसाठी Read More »

सुदृढ आरोग्याची गुरूकिल्ली

आजचे युग गतिमान आहे आणि पैस्याचे मूल्य अतोनात वाढलेले आहे. त्यामुळे जीवनव्यापन करण्यासाठी पैसा अर्जीत करत असतांना कधिकधी स्वत:कडेही आपले लक्ष नसते. आरोग्या संबंद्धीच्या लहान-सहान समस्यांकडे आपण तोवर दुर्लक्ष करत राहतो जोपर्यंत त्यांचे स्वरूप मोठे होत नाही. त्याचप्रमाणे गोष्टी हाताबाहेर जात नाहीत. त्यानंतर आपण स्वत:वर अनाठायी औषधांचा मारा सुरू करतो आणि त्यामुळे आपल्या आरोग्यात अपेक्षेप्रमाणे सुधारणाही होते. परंतू त्याबरोबर

सुदृढ आरोग्याची गुरूकिल्ली Read More »

तारुण्यातील मुले आणि पालकांची मैत्री

 जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा त्यांना आई-वडीलांच्या प्रेमाची आणि त्यांच्या प्रेमाने केलेल्या संगोपनाची नितांत गरज असते. जसे एखाद्या कोवळ्या रोपास विशेष देखभालीची, जनावराने तोंड लावू नये म्हणून कुंपनाची, तसेच रखरखत्या उन्हापासून वाचवण्याचीही गरज असते. तसेच आपले बालपणही असते ज्यात इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आपल्याला आपल्या सभोवताल असलेल्या माणसांच्या सहवासात मायेचा व वात्सल्याचा अनुभव हवा हवासा वाटत असतो. त्यामुळे जन्मदात्यांच्या

तारुण्यातील मुले आणि पालकांची मैत्री Read More »