Rekha

इच्छा तिथे मार्ग

जीवनाच्या विवीध रंगी छटा विलोभनीय असतात. तसेच आपल्या मनाला भुरळ पाडणार्‍या व गुंतवून ठेवणार्‍या असतात. कौटूंबिक सुखाची उबदार चादर ओढून भविष्याची सुखस्वप्न बघत आयुष्याची कल्पना करूनही परमानंद प्राप्त होतो. आपल्या कल्पनेतील आयुष्यात केवळ सुखच असते दु:खाची छायाही आपण त्यावर पडू देत नाही. ज्या कुटूंबात तसेच ज्या परिस्थितीत आपण जन्म घेतो त्यालाच आपले सर्वस्व मानून त्याचा […]

इच्छा तिथे मार्ग Read More »

मितभाषी स्वभावाविषयी गैरसमज

माणसाचा स्वभाव हा माणसाची ओळख असतो. जर आपण एखाद्या व्यक्तीविषयी कोणाकडे माहिती काढली तर त्याच्या स्वभावाबद्दल आवर्जून बोलले जाते. जर कोणी जास्त बोलणारा असेल तर त्याच्याविषयी सकारात्मक बोलले जाते. जसे तो मनमिळाऊ आहे, त्याच्या मनात काही राहत नाही, साफ मनाचा आहे, बोलून मोकळा होतो. परंतू जो शांत स्वभावाचा असतो, लाजरा असतो तसेच सहज कोणाशी काही बोलण्यास ज्याला कष्ट पडतात.

मितभाषी स्वभावाविषयी गैरसमज Read More »

स्त्रिधन

 घरात मुलीचे आगमन झाल्यावर आई-वडीलांना आनंद होण्यासोबतच एका मोठ्या जबाबदारीची व कर्तव्याची जाणीव होते. कारण आई-वडील मुलीला परक्याचे धन मानतात. समाजनियमानुसार मुली आई-वडीलांच्या घरात पाहुण्याच असतात. आपल्या आयुष्याचा काही काळ तिथे घालवून त्या दिल्या घरी निघून जातात. आणि तेच त्यांचे खरे आयुष्य व घर असते. परंतू आई-वडीलांना आपल्या मुली प्राणांहून प्रिय असतात. त्यांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे

स्त्रिधन Read More »

आपल्यातील विशेषतांना श्रेष्ठत्वास न्यावे

 निसर्गाशी आपले घनिष्ठ नाते असो वा नसो तरिही निसर्गापासून आपल्याला खुप काही शिकावयास मिळते. निसर्ग हा जीवनदाता आहे. निसर्गात सर्वत्र मुबलकता, समृद्धी व भरभराट आहे. तसेच निसर्गातील प्रत्येक गोष्ट तिच्या अस्सल गुणधर्मात विराजमान आहे. तसेच तिथे तिचे महत्वाचे स्थान देखील आहे. तिच्या असण्याला अर्थ प्राप्त आहे. जसे सर्वदूर पसरलेले भव्य निळेशार आकाश आपल्याला प्रगतीचे पंख लावून

आपल्यातील विशेषतांना श्रेष्ठत्वास न्यावे Read More »

जीवनाचे मुल्यमापन

 जीवन सुंदर आहे. किंबहुना ज्याला जीवनाचा खरा अर्थ कळला तो इतरांच्या जीवनाला मुल्य जोडून जीवनाला आणखीच सुंदर बनवीतो. परंतू आजच्या काळात जो तो प्रत्येक गोष्टीत आपला नफा शोधत असतो. त्या गोष्टीं मागचा समाजव्यापी व राष्ट्र्व्यापी दृष्टीकोन बघण्यास कोणाकडेही वेळ नाही. तरूण पिढी शिक्षणाचे क्षेत्र निवडतांना  त्याची आता किती मागणी आहे हा विचार सर्वप्रथम करत असते. त्याचप्रमाणे

जीवनाचे मुल्यमापन Read More »

अंतर्मनाचे सौंदर्य

जी व्यक्ती आंतरीक सौंदर्याने समृद्ध असते ती देवाचीही लाडकी असते. त्या व्यक्तीचे पडणारे प्रत्येक पाऊल देव अलगद टिपतो. संकटसमयी वेगवेगळ्या स्वरूपात त्याच्या पाठीशी उभा राहतो. अंतर्मनाच्या माध्यमातून त्याचे मार्गदर्शन करतो. त्याचप्रमाणे एक बालहृदय निरागस, निष्पाप व निर्दोष असते. आपल्याला  त्यास आजीवन तसेच जोपासता आले तर सृष्टीने दाखवीलेल्या मार्गावर आपण निर्भीडपणे मार्गक्रमण करू शकतो. परंतू जेव्हा त्या अंतर्मनाच्या सौंदर्यावर

अंतर्मनाचे सौंदर्य Read More »

देवाचे अस्तित्व

जेव्हा सर्वसामान्यांना देवाच्या अस्तित्वाची जाणीव झाली तेव्हा ते त्यांच्या जीवनातील समस्या व दु:खांचे निरसण करण्यासाठी देवाकडे धाव घेवू लागले. कारण देव सर्वकाही ठिक करेल ह्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळे ते लहान सहान कारणांसाठी स्वत: काही प्रयत्न न करता देवाजवळ येवू लागले. देवाला ह्या गोष्टीची जाणीव झाली आणि ह्या गोष्टीची चिंता वाटू लागली कि असेच

देवाचे अस्तित्व Read More »

जीवनप्रवास

केशवसूतांच्या ह्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनाने पहायला लावणार्‍या सुंदर ओळी जीवन जगण्याकडे दिशानिर्देश करतात. जीवन हे एखाद्या अर्थपुर्ण गाण्याप्रमाणे असते. तेव्हा ते गुनगुनत असतांना देहभान विसरून जावे. जीवनप्रवासात येणारे कटू अनुभव कटू आठवणी ह्यामध्ये जास्त काळ गुंतून न पडता व त्यांच्याशी संलग्न न होता, त्यामधून योग्य तो धडा घेवून पुढे पुढे चालत रहावे. कारण संलग्न होणे

जीवनप्रवास Read More »

जिद्द

 जीवनात आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी किंवा सद्द्य परिस्थितीचा कायापालट करण्यासाठी कठोर परीश्रमांना अन्य पर्याय नसतो. तसेच ते कठोर परीश्रम योग्य दिशेने व सकारात्मक दृष्टीकोन ठेवून केले गेले तरच फळास येतात. त्याचबरोबर अत्यंत महत्वाचे म्हणजे त्या परीश्रमांना आपल्या अंतर्मनातील जिद्द व प्रबळ इच्छाशक्तीची अजोड साथ लाभली. तरच कल्पनेतील विश्व जीवनात प्रत्यक्ष रूपात निश्चीतपणे साकार होते.

जिद्द Read More »

वेळेचे महत्व

   आपले आयुष्य क्षणा क्षणांनी पुढे जात असते. कारण वेळेला गती आहे. वेळेला कदापि आपल्या मुठीत आणता येत नाही. एकदा हातून निसटलेला क्षण कधीकधी आपली इच्छा असूनही पुन्हा जगता येत नाही. त्याचबरोबर कोणत्या क्षणाच्या पोटात आपल्यासाठी काय साठवीलेले आहे हेही आपल्याला ठाऊक नसते. म्हणूनच प्रत्येक क्षणांची गम्मत अनुभवणे गरजेचे असते. प्रत्येक क्षण हा तठस्थ असतो.

वेळेचे महत्व Read More »