Rekha

स्वाभिमान हा स्त्रियांचा अलंकार

  मुलींची कल्पनाशक्ती ही प्रबळ असते. त्याद्वारे त्या भविष्यात आपल्या जीवनाच्या जोडीदाराबरोबरची अनेक सुखस्वप्ने बघत असतात. त्याचप्रमाणे त्याच सुखद भावनांच्या साथीने वेळ आल्यावर कल्पनेतील नविन जीवनाची खरीखुरी सुरवात देखील करतात. त्यांच्या स्वप्नांच्या जगात  दु:खाला कोठेही थारा नसतो. अशाप्रकारे त्यांच्या स्वप्नातील जग एकेदिवशी प्रत्यक्षात साकार होते. जीवनातील त्या आनंदापुढे त्यांना आकाशही ठेंगणे वाटू लागते. तसेच  त्या सुखद अनुभूती […]

स्वाभिमान हा स्त्रियांचा अलंकार Read More »

कामगारांचे मानसिक स्वास्थ्य

आजच्या युगात माणसाच्या पेशावरून त्याची अधिकाधिक गणना केली जाते. त्याचप्रमाणे तशीच त्याला वागणूक सुद्धा दिली जाते. समाजात नोकरीत अधिकाऱ्याच्या  पदावर असलेले, आपण उच्च दर्ज्याची कामे करत असल्याचा अविर्भाव असलेले तसेच आपले कोणावाचून काहिही अडू शकत नाही अशी खात्री असलेले लोक असतात. ज्यांना केवळ ते आर्थिकरीत्या सबळ असल्यामुळे  संपुर्ण जग जिंकल्याचा आभास होत असतो. कारण ते

कामगारांचे मानसिक स्वास्थ्य Read More »

आपल्या आयुष्यात ”शिक्षकांचे” महत्व

 भारतात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांच्या जन्मदिवशी म्हणजे 5 सप्टेबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा करण्यात येतो. कारण शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावेत यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशिल होते. त्याचबरोबर राधाकृष्णन हे उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाविषयी त्यांना वाटणारे प्रेम व जिव्हाळा तसेच त्यासाठी त्यांनी केलेले 40 वर्षाचे कार्य याचा सम्मान करण्यासाठी म्हणून त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून घोषीत

आपल्या आयुष्यात ”शिक्षकांचे” महत्व Read More »

शेतीचे महत्व

पूर्वीच्या काळात शेती हाच मुख्य व्यवसाय होता. तेव्हा माणसाचे निसर्गाशी जिव्हाळ्याचे नाते होते. आधुनिकीकरणाची झळही माणसापर्यंत पोहोचली  नव्हती. शेती व्यवसायास पोषक हवामानही होते. त्या काळात स्वमालकीचा शेती करण्यायोग्य जमीनीचा तुकडा असणे म्हणजे मोठी गोष्ट असायची. आणि ज्याच्याकडे जेवढी जास्त जमीन असेल तो सावकार किंवा जमीनदार असायचा. समाजात तेव्हा शेतीशी निगडीत सणवार आणी त्यासंबंधीत रुढीपरंपरांना महत्व

शेतीचे महत्व Read More »

मुलगी लाडाची

घरामध्ये मुलगी जन्मास येणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट असते. कारण तीची उर्जा जन्मताच स्त्रीत्वाच्या गुणविशेषांनी सकारात्मक असते. त्यामुळे घरात चैतन्य पसरते. अशाप्रकारे मुलीच्या येण्याने घरादारास सुख समृद्धी प्राप्त होते. मुलगी आपल्या चिमुकल्या सोनपावलांनी केवळ आपल्या घरातच नव्हे तर आपल्या आयुष्यात व आपल्या हृदयातही प्रवेश करते. तसेच ती तिच्या लोभसवाण्या बालरूपात प्रत्येकास वेड लावत असते. त्यामुळे

मुलगी लाडाची Read More »

संवेदना

संवेदनेतून हृदयाची हृदयाशी तार जोडली जाते. माणुसकीला जाग येते. संवेदनेनेच समाजातील एका अति सामान्य परंतू जागरूक नागरिकालाही व्यक्तीगत पातळीवर महत्व प्राप्त होते. त्यामुळे माणसाच्या हृदयातील संवेदना रूपी ठेवा हाच त्याच्या माणूस असण्याची खरी ओळख आहे. आपल्या आसपासचा समाज जो मुलभूत समस्यांनाही त्यांच्या जगण्याचाच एक भाग समजून त्यांच्याकडे सहज दुर्लक्ष करतो. परंतू एका जागरूक नागरिकाच्या संवेदना

संवेदना Read More »

घरात वार्षिक स्वच्छतेचे महत्व

सणासुदीचे दिवस घरात उत्साह व आनंद घेवून येत असतात. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये ह्या ना त्या कारणाने चैतन्य संचारलेले असते. कारण त्या दिवसांचे औचित्य साधून पुजाअर्चा करणे, घरात गोडधोड पदार्थांचा दर्वळ पसरणे, नवनविन वस्तू दागिने व कपड्यांची खरेदी करणे ह्या सर्व गोष्टी घडत असतात. त्याचप्रमाणे विशेष मुहूर्त बघून संपत्ती खरेदी करणे किंवा घरात एखाद्या मंगलकार्याचे आयोजन करणे अशा मनाला

घरात वार्षिक स्वच्छतेचे महत्व Read More »

स्त्रि शक्ती

स्त्रियांना  सृष्टीने विशेष घड्विले आहे. त्याचप्रमाणे त्यांना खास नैसर्गिक जबाबदार्‍या देवून गौरविले सुद्धा आहे. तसेच सृष्टीला हे सुद्धा माहित होते की तिने ज्या जबाबदार्‍या  स्त्रियांवर सोपविल्या आहेत त्यांना स्वबळावर पेलतांना स्त्रियांना मानसिक तसेच शारिरीक वेदनाही होणार आहेत. म्हणूनच त्या त्रासाला किंवा वेदनांना सहन करण्याची आंतरिक ताकद सुद्धा सृष्टीने स्त्रियांना बहाल केली आहे. तेव्हा प्रत्येक स्त्री ही स्त्रीशक्तीच्या व

स्त्रि शक्ती Read More »

स्त्रियांना पुरुषांचे पाठबळ आवश्यक का?

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचे निरपेक्ष योगदान व पडद्यामागची भूमिका ही असतेच. त्याशिवाय त्या पुरुषाचे यशस्वी होणेच अशक्यप्राय आहे. कारण स्त्री मग ती कोणत्याही भूमिकेच्या माध्यमातून का असेना ज्या पुरुषाच्या आयुष्याशी जोडली जाते त्या पुरुषाप्रती कायम कृतज्ञ असते. त्याचप्रमाणे त्या पुरुषाच्या प्रगतीची मनोमन कामना करते. त्याच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या गोष्टींप्रती सतर्कता बाळगते. त्याची काळजी

स्त्रियांना पुरुषांचे पाठबळ आवश्यक का? Read More »

प्रोत्साहन व शिस्त

प्रोत्साहन व शिस्त ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आयुष्य यशस्वीरित्या पुढे नेण्यासाठी प्रेरक हेतू पाहिजे असतो. अन्यथा आपल्या जीवनाला काहिही अर्थ उरत नाही. एखाद्या व्यक्तीस दररोज कामावर जाण्यासाठी कोणाकडून प्रेरणा घेण्याची आवश्यकता नसते. कारण कुटूंबाप्रती असलेल्या त्याच्या जबाबदार्‍या व त्याची कर्तव्ये त्याच्यासाठी प्रोत्साहनाचे काम करतात. परंतू त्याला त्याच्या कामात उन्नती करावयाची असेल तर मात्र

प्रोत्साहन व शिस्त Read More »